महाराष्ट्र राज्यात सुधारित पीक विमा योजना राबविण्यात येत असून या योजनेच्या कार्यान्वयनासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे दोन प्रमुख गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या गटातील जिल्ह्यांसाठी एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (एआयसी ऑफ इंडिया) ही विमा सेवा पुरवणार आहे.
तर दुसऱ्या गटातील जिल्ह्यांसाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी ही जबाबदारी पार पाडणार आहे. सध्याच्या स्थितीनुसार धाराशिव, बीड आणि लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीद्वारे पहिल्या नोव्हेंबर २०२५ पासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
उर्वरित जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
लागणारी कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- 712/ 8 A
- Farmer id
टीप :- जवळच्या csc सेंटर भेट द्या
अधिक माहिती साठी :- ओम साई मल्टीसर्व्हिसेस
शासकीय तंत्रनिकेत सोलापूर रोड धाराशिव

0 Comments